Sunday 27 November 2011

आवडीच्या बोधकथा

बालगोष्टींची सुरुवात कधी झाली माहीत आहे? तब्बल दोन हजार वर्षापूर्वी. तेव्हा पंचतंत्रातल्या प्राणीकथा लिहिल्या गेल्या. इथूनच बालसाहित्याला सुरुवात झाली असं मानलं जातं. तेव्हापासून आजवर मुलांच्या गोष्टींमध्ये प्राणी-पक्षी असतात, ते माणसांसारखं बोलतात, वागतात आणि म्हणून तुम्हाला आवडतात. म्हणजे बघा, इतकी वर्षे या गोष्टी आणि त्यातले प्राणी तुम्हाला आनंद देतात, तुमचं मनोरंजन करतात आणि त्यासोबत ज्ञानही देतात.
 
पंचतंत्रानंतर इसापनीतीचं नाव घेतलं जातं. कुरूप असलेल्या इसापने माणसांनी कसं वागावं, कसं बोलावं आणि कसं जगावं, याचा वस्तुपाठ आपल्या गोष्टींमध्ये सांगितला आहे. त्यामुळे त्या आजच नाही तर केव्हाही वाचल्या तरी चांगल्या वाटतात. आवडतात. चांगल्या पुस्तकांची हीच व्याख्या असते की, ती केव्हाही वाचली तरी ‘आपली’ वाटतात.
 
पंचतंत्र, इसापनीतीनंतर बोधकथांचा नंबर लागतो. बोधकथा या पंचतंत्र आणि इसापीनीतीचं काहीसं मिश्रण असतं. म्हणजे नावाप्रमाणे त्यात बोध असतो आणि प्राणी-पक्षीही असतात. बोधकथांमध्ये एक छोटीशी गोष्ट सांगितली जाते आणि त्यावरून काय बोध घ्यायचा वा घ्यायचा नाही, हे सांगण्याचा प्रयत्न केला जातो. या पुस्तकात एकंदर पंधरा कथा आहेत. त्या सर्व दोन-तीन पानांच्या आहेत. शिवाय या कथांचा टाइप तुम्हाला वाचता येईल असा ब-यापैकी मोठा आहे, प्रत्येक कथेत चित्रे आहेत. यातल्या काही कथा तुम्ही यापूर्वी वाचल्या असतील वा शिक्षक, आई-बाबा, मित्र-मैत्रिणी यांच्याकडून ऐकल्याही असतील. पण यातल्या काही कथा तुम्ही पहिल्यांदाच वाचत असाल. या नव्या कथांसाठी हे पुस्तक वाचा.  
   
मुलांच्या आवडीच्या निवडक बोधकथा : रवींद्र कोल्हे
 
साकेत प्रकाशन, औरंगाबाद
 पाने : 46, किंमत : 40 रुपये

No comments:

Post a Comment